सिडनी : दररोजच्या आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश असेल तर हृदयविकाराचा धोका 25 टक्क्यांनी कमी होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियातील न्यू लेडीज कावेन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी पन्नास हजार रुग्णांवर संशोधन करून हा निष्कर्ष प्रसिद्ध केला आहे.
या संशोधना संदर्भात प्रसिद्ध झालेल्या अहवालाप्रमाणे दररोजच्या आहारामध्ये एक कप हिरव्या भाज्यांचा समावेश असेल तर हृदयविकाराचा धोका कमी होतो हिरव्या पानांच्या भाज्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त असल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि रक्तदाबही नियंत्रित होतो. सध्या जगभरात करोना महामारीने थैमान घातले असले तरी दरवर्षी हृदयविकाराने दोन कोटी पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो.
नैसर्गिक मृत्यु च्या कारणांमध्ये हृदयविकार हे सर्वात महत्त्वाचे कारण मानले जाते विद्यापीठाच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे डेन्मार्कमधील पन्नास हजार लोकांवर संशोधन करण्यात आले हे संशोधन गेली 23 वर्षे सतत सुरू होते. ज्या लोकांनी गेल्या तेवीस वर्षाच्या कालावधीमध्ये दररोज आहारामध्ये हिरव्या पानांच्या भाज्या ठेवल्या होत्या त्यांचा हृदयविकाराचा धोका बारा ते 25 टक्क्यांनी कमी झाल्याचे लक्षात आले.
संशोधनाच्या प्रमुख डॉक्टर कॅथरीन बॉंडेंन यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे शरीरातील रक्तवाहिन्या पातळ होण्याचा धोकाही हिरव्या भाज्या आहारात ठेवल्यामुळे कमी होतो. हिरव्या भाज्यांमधून मोठ्या प्रमाणात नायट्रेट मिळत असल्याने लोकांनी नायट्रेटचे कृत्रिम सप्लिमेंट वापरणे टाळावे असाही सल्ला या संशोधकांनी दिला आहे. पालक आणि या प्रकारातली इतर भाज्या नेहमीप्रमाणेच आहारात घ्याव्यात या भाज्यांचे सूप करून घेतले तर त्याचा त्या प्रमाणात फायदा होत नाही असे ही सांगण्यात आले आहे