नवी दिल्ली – जगाच्या पाठीवरील जवळपास सर्वच देश सध्या कोरोना विषाणू विरोधात लढा देत आहेत. या जीवघेण्या विषाणूवर प्रतिबंधात्मक लस निर्माण करणे, ओषोधोपचार पद्धती विकसित करणे यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ अहोरात्र झटत आहेत. मात्र त्यांच्या प्रयत्नांना अद्याप तरी यश आलं नाहीये. असं असलं तरी कोरोना संकटाने ठप्प झालेलं अर्थचक्र सुरु न केल्यास येणारं आर्थिक संकट याहूनही भयाण असेल यात शंका नाही. याचीच जाणीव ठेवत आता जगाच्या पाठीवरील अनेक देशांनी लॉक डाऊन शिथिल करत कोरोना सोबत जगण्यास सुरुवात केली आहे.
भारतामध्ये देखील लॉक डाऊनचे कठोर निर्बंध असलेले तीन टप्पे पाळल्यानंतर चौथ्या टप्प्यामध्ये सावधगिरी बाळगत शिथिलता देण्यात येतीये. याचाच भाग म्हणून सरकारने येत्या २५ मेपासून देशांतर्गत नागरी विमानसेवा सुरु करणार असल्याचा निर्णय जाहीर केला होता. आता केंद्र सरकार आंतराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्याबाबत देखील विचार करत असून याबाबतचे संकेत खुद्द केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिलेत.
एका नामांकित वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली असून कोरोना विषाणू प्रसाराचा वेग स्थिरावल्यास किंवा मंदावल्यास जून मध्यापर्यंत अथवा जुलै अखेरपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करता येतील असं पुरी यांनी म्हंटलं आहे. ‘पुढील काही महिन्यांमध्ये कोरोना विषाणूच्या प्रसाराचा वेग अपेक्षेप्रमाणे राहिल्यास आपल्याला या विषाणूसोबत जगण्याचे पाऊल उचलता येईल. असे झाल्यास आंतराष्ट्रीय विमान प्रवासासाठी ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत वाट पाहण्याची गरज भासणार नाही.’ असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Why wait till August-Sept? If situation eases or improves – if virus behaves in predictable manner, we get used to idea of being able to co-exist with it&we’re in position to make arrangements-why not start by June middle or end July?: Civil Aviation Min on int’l flight movement pic.twitter.com/96PflBUrLS
— ANI (@ANI) May 23, 2020