औरंगाबाद – राजकारणात सर्वाधिक खडतर समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. तर काही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरू आहे. राज्यभर चर्चेत असलेले आदर्श सरपंच भास्कर पेरे-पाटील यांच्या पॅनलला या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे. गेल्या २५ वर्षापासून पाटोदा ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून भास्करराव पेरे पाटील काम करत होते.
अत्यंत गुंतागुंतीची समजली जाणारा ग्रामपंचातय निवडणूक काठावर विजय किंवा पराभव करणारी असते. त्यामुळे एक मताला देखील महत्त्व प्राप्त होते. त्यात गावगाड्यातील मतभेद या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. सक्रिय राजकारणातून निवृत्त होणारे पेरे पाटील यांच्या पॅनलाचा या निवडणुकीत दारुण परभाव झाला. त्यामुळे भास्कर पेरे-पाटील यांचे पटोदा ग्रामपंचायतीतील वर्चस्व संपुष्टात आले आहे.
11 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीपूर्वीच आठ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. तर तीन जागांसाठी निवडणूक घेण्यात आली, यात भास्कर पेरे पाटील यांची मुलगी अनुराधा पेरे उमेदवार होत्या. अनुराधा यांना गावातील मतदारांनी नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. अनुराधा पाटील यांना १८३ मते मिळाली तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या उमेदवाराला २०८ मते मिळाल्याने त्यांचा विजय झाला.
भास्करराव पेरे पाटील यांनी यंदाच्या निवडणुकीत माघार घेत मुलीला उभं केलं होतं, ग्रामपंचायत बिनविरोध होत असेल, तर त्याचे स्वागत करायला हवे. मात्र पैशाचे आमिष दाखवून कोणी बिनविरोध करू पाहत असेल, तर निवडणूक व्हायला हवी, अशी भूमिका पेरे पाटील यांनी घेतली होती.