सांगली – राज्यातील 15 जिल्ह्यांतील 238 ग्रामपंचायतींसाठी काल (दि.05) मतदान झाले होते. त्याचा निकाल आज जाहीर झाला आहे. सांगलीतील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून दिवंगत नेते आरआर आबा यांचे सुपुत्र राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्या गटाने तासगावच्या किंदरवाडी ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवली आहे. सात पैकी सात जागांवर विजय मिळविण्यात एनसीपीला यश आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहित आर.आर. पाटील आणि भाजपचे खासदार संजय काका पाटील या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र यात रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे. तसेच भाजपाच्या काही उमेदवारांचे डिपॉझिट देखील जप्त झाले आहे.