मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची तयारी सुरु झाली असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने असमर्थता दाखवल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संदर्भात संध्याकाळपर्यंत निर्णय घेतला जाईल.
— Bhagat Singh Koshyari (@BSKoshyari) November 12, 2019
दरम्यान राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे या संदर्भातला अहवाल पाठवला असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकले होते. मात्र राजभवनाच्या प्रवक्त्यानी या वृत्ताचे खंडन केले आहे. राज्यपालांनी अशा प्रकारची कोणतीही शिफारस केली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Sources: #Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari recommends President’s rule in the state. pic.twitter.com/h1tpcrRhos
— ANI (@ANI) November 12, 2019
महाराष्ट्रात सत्तस्थापनेचा गोंधळ काही केल्या संपत नसल्याचे दिसत आहे. भाजपाने सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवली. त्यानंतर राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला निमंत्रण दिले. मात्र त्यांना हा दावा सिद्ध करता आला नाही. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला निमंत्रण दिले. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस जर रात्री साडेआठ पर्यंत सत्ता स्थापनेचा दावा सिद्ध करु शकली नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असे स्पष्ट होत आहे.
दिल्लीतही घडामोडींना वेग आला आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेटची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महाराष्ट्रात जो राजकीय पेच निर्माण झाला आहे त्याची चर्चा होऊ शकते. त्यामुळे दिल्लीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिक्स समिटसाठी ब्राझिलला जाणार आहेत. मात्र त्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेटची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.