मुंबई – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
तरुण गोगोई हे आसामचे यशस्वी मुख्यमंत्री व लोकप्रिय नेते होते. मुख्यमंत्रीपदाच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी आसामच्या विकास प्रक्रियेत मोठे योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे आसामने तसेच देशाने एक अनुभवसंपन्न व अभ्यासू नेता गमावला आहे. गोगोई यांना श्रद्धांजली वाहतो तसेच आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवितो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.