मुंबई : राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्यातील नागरिकांना बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
बकरी ईद (ईद उल झुहा) हा पवित्र सण पूर्ण श्रद्धा व समर्पण भावनेचा संदेश देतो. हा सण साजरा करताना दानधर्म तसेच उपेक्षित वर्गाच्या कल्याणाचा उदात्त विचार केलेला आहे. बकरी ईदच्या सणानिमित्त मी राज्यातील नागरिकांना विशेषतः मुस्लीम बंधू – भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.