मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केल्यामुळे चर्चेत आले आहेत. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातून त्यांच्याविरोधात प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. ‘हे भाज्यपाल मराठी माणसाच्या राशीला नकोत’ असं म्हणत आव्हाड यांनी राज्यपालांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला आहे.
कोश्यारींच्या विधानानंतर आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे.ज्यात ते म्हणतात,”थोड्या दिवसांपूर्वी स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होत की हे भाज्यपाल मराठी माणसाच्या राशीला नकोत. महात्मा फुले,छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वाईट बोलले गेले पुन्हा एकदा संपूर्ण देशाचे आदर्श आहेत अशा महाराजांबद्दल त्यांना जुने आदर्श म्हणून हिणवले बस झाले आता बोचंक गुंडाळ” असं स्पष्ट मत यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे.
काय म्हणाले होते कोश्यारी नेमकं
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ काल पार पडला. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या विधानामुळे नवा वाद सुरु झाला आहे. यावेळी बोलताना कोश्यारी म्हणाले, तुम्हा तरुण मुलांना जर कोणी विचारले तुमचा आयकॉन कोण ? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही,महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळतील” असं विधान कोश्यारींनी केलं होत.