मुंबई: बालभारतीच्या शिक्षणव्यवस्थेतील बदल करण्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्राला एका वेगळ्या वळणावर नेण्याचे काम सरकार जाणीवपूर्वक करत आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या अंगवळणी पडलेल्या गोष्टी बदलून वेगळं वळण देण्याचं काम बालभारतीच्या माध्यमातून करण्याचे षडयंत्र हे सरकार करत असल्याचा आरोप विधिमंडळ पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
वर्षानुवर्षे जी शिक्षणपद्धती रूजलेली आहे त्यामध्ये मोडता घालण्याचे काम भाजपा सरकार करत आहे. महाराष्ट्रातील जनतेने याला विरोध केलेला आहे. त्यामुळे सरकारने ही नवी पद्धत त्वरित बदलावी अशी मागणी जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.