पंढरपूर – शेतकरी सध्या नापिकीमुळे कर्जात अडकलेला आहे. त्यातच दुष्काळामुळे खरिपाचं पिकही हाती लागले नाही. अशा परिस्थिततीत सरकारकडून मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची सरकारकडून थट्टा सुरू असल्यांच चित्र आहे. कारण माढा तालुक्यातील शेतकऱ्याला केवळ चार रूपयांचं खरीप अनुदान मिळालं आहे.
2018 सालच्या खरीप पिकाच्या अनुदानापोटी शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ 4 रूपये जमा करण्यात आले. पंडित इंगळे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. पंडित इंगळे हे माढा तालुक्यातील ढवळस गावचे रहिवासी आहेत.
त्यानंतर शेतकऱ्याने यावर संताप केला आहे. “मदत दिली नसती तरी चाललं असतं, मात्र चार रूपये देऊन थट्टा का करताय”, असा सवाल शेतकऱ्याने केला आहे.