वर्धा – वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे कामावर जाणाऱ्या प्राध्यापक तरुणीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणाविरोधात हिंगणघाटमध्ये मंगळवारी सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला आहे. एकतर्फी प्रेमातून आरोपीने पीडित तरुणीला जिवंत जाळले होते. पीडित तरुणीवर उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला नागपूर जिल्ह्यातून अटक केली. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
जालन्याची घटना ताजी असतांनाचं वर्धा जिल्ह्यातं हिंगणघाट येथे सकाळी भर रस्त्यावर नांदोरी चौकात एका शिक्षिका असणाऱ्या युवतीला जिवंत जाळण्याचा गंभीर प्रकार घडलायं ज्यात युवती गंभीर जखमी झालेली आहे.राज्यातं कायदा सुरक्षेचे धिंडवडे निघतांना दिसताहेत (1/2) @CMOMaharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/yGutyoeec2
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 3, 2020
चित्रा वाघ यांनी ट्विट केले आहे की,’जालन्याची घटना ताजी असतांनाचं वर्धा जिल्ह्यातं हिंगणघाट येथे सकाळी भर रस्त्यावर नांदोरी चौकात एका शिक्षिका असणाऱ्या युवतीला जिवंत जाळण्याचा गंभीर प्रकार घडलायं ज्यात युवती गंभीर जखमी झालेली आहे.राज्यातं कायदा सुरक्षेचे धिंडवडे निघतांना दिसताहेत’ असं ट्विटद्वारे संतप्त प्रतिक्रिया दिली आहे तसेच एकतर्फी प्रेमातून आरोपीने पीडित तरुणीला जिवंत जाळले. त्या पीडित तरुणीवर उपचाराचा खर्च सरकारने करावा, असं म्हणत चित्रा वाघ यांनी या घटनेची निंदा केली आहे.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी विकेश उर्फ विक्की नगराळे याला नागपूर येथून अटक केली. विक्की पीडित तरुणीवर एकतर्फी प्रेम करतो. त्याचे लग्न झालेले असून तो पीडित तरुणी ज्या गावात राहते त्याच गावात राहतो. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि सर्वपक्षियांनी आज हिंगणघाट बंदची हाक दिली आहे