बडवाणी / मध्य प्रदेश : लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांच्या प्रश्नांचे लवकर निराकरण व्हावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील सेंधवा गावाजवळ धरणे आंदोलन केले आहे. निषेध व्यक्त करतांना पाटकर यांनी कोणतेही नियोजन न करता देशात केंद्र सरकारने निर्बंध लादले आहेत. तसेच राज्य व केंद्र यांच्यात समन्वय नसल्याचा आरोप केला आहे. लॉकडाऊनमुळे कामगार पगार न घेताच घरी परतता आहेत. सरकाने त्यांना जगण्यासाठी अन्नधान्य मोफत नसल्यास नाममात्र दराने द्यावे.’अशी मागणी देखील त्यांनी केली.
देशभरातील कामगार राष्ट्रीय महामार्गावर असहाय्यपणे चालत आहेत. त्यांनी उत्पादित केलेल्या गाड्यामध्ये बसूनसुद्धा कामगार घरी जाऊ शकत नाहीत. सरकारने ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना गावी जाण्यासाठी व्यवस्था केली आहे, तशीच व्यवस्था कामगारांना घरी जाण्यासाठी का केली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना पाटकर म्हणाल्या , “जीडीपी, उत्पादन असो वा वितरण, देशातील कामगार प्रत्येक क्षेत्रात योगदान देतात.” परंतु कामगारांची त्यांच्याकडून कोणतीही काळजी घेतली जात नाही. कामगार वेतन न घेताच घरी निघून जात आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचे राशन मिळालेले नाही. तसेच कोणतीही सरकारी मदत त्यांच्यापर्यंत पोहचली नाही. सरकारने प्रत्येक कामगारांना प्रत्येकी ५ किलो दिलेले राशन महिनाभर कसे जाईल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.