मुंबई: महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन १५ दिवस झाले तरी देखील खातेवाटप झाले नाही. याच मुद्द्यावरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीचं सरकार हे स्थगिती सरकार आहे. अद्याप या सरकारने खातेवाटपही केलं नाही, त्यामुळे नेमके कुणाला प्रश्न विचारायचे असा प्रश्न आम्हाला पडला आहे, असे म्हणत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
तसेच, शिवसेनेने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोराकरणार असल्याची घोषणा केली होती, ती कधी राबवणार, नेमकं सरसकट कर्जमाफी कधी होणार याचा किमान कार्यक्रम तरी जाहीर करावा, अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे.
Former Maharashtra Chief Minister & BJP leader, Devendra Fadnavis in Nagpur: Earlier Shiv Sena was with us and all the decisions were taken together. Now, the same Shiv Sena is opposing all those decisions and stopping work. pic.twitter.com/E2GOxk473w
— ANI (@ANI) December 15, 2019
निवडणूक काळात या राजकीय पक्षांकडून जी सर्व आश्वासनेच होती, तीच आठवण आम्ही करून देत आहोत. सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडता कामा नये, हे सरकार स्थगिती सरकार असून महाराष्ट्र जवळजवळ ठप्प झाल्याचं दिसत आहे. सरकारच्या भूमिकेमुळे राज्यात असंतोष असून स्थगिती अशीच राहणार का? असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.