मुंबई –वारकरी संप्रदायाची मर्यादित संख्येत निर्बंधासह पायी वारीची मागणी धुडकावून वारीची परंपरा खंडीत करणारे महाविकास आघाडी सरकार हे महाराष्ट्र द्रोही सरकार आहे”, असल्याची घणाघाती टीका भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रदेश संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रात मुघलांच सरकार आहे, हे पुन्हा आता सिद्ध झाल्याचं त्यांनी म्हटलं.
मर्यादित संख्येत सर्व निर्बंध पाळून पायी वारी करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी वारकरी संप्रदायाकडून करण्यात आली होती. पण ती मागणी फेटाळून पुन्हा एकदा परंपरा खंडित करण्याचं काम ठाकरे सरकारकडून करण्यात आलं आहे. हा वारकऱ्यांचा अपमान आहे. हा अपमान आम्ही सहन करणार नाही, असं आचार्य भोसले यांनी म्हटलं.
वारकरी संप्रदाय कुठल्याही परिस्थित मर्यादित संख्येत सर्व निर्बंध पाळून पायी वारीची पंरपरा जोपसण्यावर ठाम आहे. यावरून कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला ठाकरे सरकार जबाबदार असेन, असंही आचार्य तुषार भोसले यांनी म्हटलं आहे.
वारीसंदर्भातील सरकारच्या निर्णयावरून आचार्य तुषार भोसले आक्रमक, सरकारला दिला इशारा… म्हणाले pic.twitter.com/OuSi2pYSxZ
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) June 11, 2021
वारकऱ्यांचा अनादर करणारे सरकार इतक वाईट सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात झालं नाही. मुघलाच्या आणि ब्रिटीशांच्या काळात देखील वारी खंडीत झाली नाही. पण ठाकरे सरकारच्या काळात वारी परंपरा खंडीत झाली. पायी वारीची परंपरा खंडीत करणार महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे महाराष्ट्र द्रोही सरकार असल्याची जोरदार टीका आचार्य भोसले यांनी केली आहे.