पुसेगाव (प्रतिनिधी) – देशामध्ये व राज्यामध्ये पाणीपुरवठा विभागाने क्रांती केली असून जलजीवन योजनेतून ३८ हजार गावांना पाणी देण्याचे काम या सरकारने केले असून १२०८ कोटीचे भूमीपूजन आज केले आहे. आमदार महेश शिंदे यांनी मतदारसंघात जलजीवन योजनेपासून कोणतेच गाव वंचित ठेवले नाही,
असे प्रतिपादन पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी पुसेगाव येथील जाहीर सभेत केले . पुसेगाव (ता. खटाव) येथे पुसेगाव, बुध, खटाव या गावातील जलजीवन योजनांचे भूमिपूजन ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते .