कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा सरकारवर आरोप
सुरत : कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे त्यांच्यावरील मानहानीच्या एका खटल्याप्रकरणी सूरतमधील न्यायालयासमोर हजर झाले. या खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने 10 डिसेंबरपर्यंत खटल्याची सुनावणी पुढे ढकलली आहे. दरम्यान, राहुल गांधींना 11 ऑक्टोबरला आणखी एका मानहानीच्या खटल्यासाठी अहमदाबाद येथील एका न्यायालयात हजर व्हावे लागणार आहे. यावर बोलताना, मला शांत बसवण्यासाठी विरोधी पक्षाकडून हे खटले दाखल करण्यात आले असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
Gujarat: Rahul Gandhi appeared at Surat Court in connection with a case over his comment”Why do all thieves have Modi in their names”. He has filed an application for permanent exemption.Court has given a date of 10th Dec for reply to his application. (earlier visuals) pic.twitter.com/otzMu25rKW
— ANI (@ANI) October 10, 2019
कर्नाटकमधील कोलार येथील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद मोदींविरोधात विधान केले होते. सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे असते, असा सवाल त्यांनी सभेला उपस्थितीत असलेल्या लोकांना केला होता. यावरुनच त्यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्यात आला होता.
I am in Surat today to appear in a defamation case filed against me by my political opponents, desperate to silence me.
I am grateful for the love & support of the Congress workers who have gathered here to express their solidarity with me. #SatyamevJayate pic.twitter.com/HZmAcEhciu
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 10, 2019
सूरतला आलेल्या राहुल गांधींनी न्यायालयाल सुनावणीस गैरहजर राहण्याची परवानगी मिळावी, यासाठी अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने याचे उत्तर देण्यासाठी 10 डिसेंबर तारीख दिली आहे. याबाबत ट्विट करताना राहुल गांधी म्हणाले की, मला शांत बसवण्यासाठी अधीर झालेल्या माझ्या राजकीय विरोधकांनी दाखल केलेल्या मानहानीच्या याचिकेसाठी मी आज सूरतमध्ये आहे. मी कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे प्रेम आणि त्यांनी समर्थनासाठी मी आभार व्यक्त करतो.