मुंबई : देशभरात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना, मुंबईतून एक चांगली बातमी समोर आली आहे. कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या 12 कोरोनाबाधितांची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र असे असले तरी त्यांना पुढील चौदा दिवस क्वॉरन्टाईन अर्थात विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली आहे.
दरम्यान, या अगोदर महाराष्ट्रातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याची चाचणी निगेटिव्ह आली होती. पुण्यातील दाम्पत्याची चाचणी निगेटिव्ह आल्याचे कालच स्पष्ट झाले होते.
आता मुंबईतील 12 जणांची चाचणी निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु हे सगळे जण पुढील काही दिवस निरीक्षणाखालीच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.