नवी दिल्ली – आता प्रवाशांना आपल्या रेल्वे प्रवासात शिजवलेल्या भोजनाचा आस्वाद घेता येणार आहे. भारतीय रेल्वेने रेल्वेत शिजवलेले अन्नपदार्थ प्रवाशांना देण्याची सुविधा पुन्हा सुरू केली आहे.
करोनाच्या काळात सर्व प्रवाशांसाठी रेल्वेमध्ये खाण्यापासून अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले होते, पण आता निर्बंध शिथिल होत करण्यात आले आहेत. सुमारे 428 रेल्वेंमध्ये ही सुविधा प्रवाशांना मिळणार आहे.
रेल्वे बोर्डाने एका पत्राद्वारे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनला सेवा पुन्हा सुरू करण्यास सांगितले आहे. रेल्वे बोर्डाने असेही म्हटले आहे की प्रवाशांना खाण्यासाठी तयार जेवण दिले जाईल. आतापर्यंत कोविड निर्बंधामुळे, रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फक्त चहा, नाश्ता आणि लांब पल्ल्याच्या ट्रेन प्रवासासाठीच तयार जेवण मिळत होते.