नवी दिल्ली – केंद्र सरकार 50 लाखांपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी (Central Government Employees) आणि 60 लाखांपेक्षा जास्त पेंशन धारकांना लवकरच आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय कर्मचारी अनेक दिवसांपासून महागाई भत्याची (DA) घोषणा होईल या प्रतिक्षेत आहेत. ही प्रतिक्षा लवकरच समाप्त होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार या महिन्यातच केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्यात 4 टक्के वाढ करण्याची घोषणा करु शकते. यामुळे त्यांच्या पगारात सरळ-सरळ वाढ होणार आहे.
श्रम विभागाने ऑल इंडिया कंज्यूमर प्राइस इंडेक्सची (AICPI) घोषणा आताच काही दिवसापूर्वी केली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची महागाई भत्यात वाढ होणार असल्याची आशा वाढली आहे. केंद्र सरकारच्या एआईसीपीआई मधून महागाई भत्याचे दर निश्चित केले जातात.
– सरकार टीए मध्ये ही 4 टक्के वाढ करणार
एआईसीपीआईच्या आधारावर म्हटले जावू शकते की, सरकार महागाई भत्यात 4 टक्के वाढ करेल. यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेंशनधारकांना याचा मोठा लाभ होईल. सातव्या वेतन आयोगानुसार, जर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात 4 टक्क्याने वाढ होते तर त्यांच्या प्रवास भत्यातसुद्धा 4 टक्क्याने वाढ होईल. परंतु केंद्रीय 1 जुलै 2020 ते 1 जानेवारी 2021 पर्यंतचा डीए दिला जाणार नाही. केंद्र सरकारकडून कोरोना संकटामुळे एप्रिल 2020 मध्ये महागाई भत्यावर निर्बंध घालण्यात आले होते. तेव्हा केल्या गेलेल्या घोषणेनुसार, जून 2021 पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळणार नाही.
– या वाढीमुळे 21 टक्के होईल महागाई भत्ता
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीए आणि डियरनेस रिलीफचा लाभ दिला जात नाही. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 17 टक्के आहे. डीए मध्ये 4 टक्के वाढ झाल्यानंतर तो 21 टक्के होईल आणि ट्रॅव्हल अलाउंस ही 4 टक्के वाढेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेंशन धारकांच्या पेंशनमध्ये चांगल्या प्रकारे वाढ होईल.