साताऱ्यात हॉलमार्क दागिन्यांची सुरुवात करणाऱ्या श्री वर्धमान ज्वेलर्सच्या स्थापनेस यंदा 50 वर्षे पूर्ण होत आहेत. अनेक वैशिष्ट्यांनी नावलौकिक मिळवणाऱ्या या सुवर्णपेढीच्या अर्धशतकी वाटचालीबद्दल सलग 50 दिवसांच्या कालावधीत श्री वर्धमान महोत्सवानिमित्त दागिने खरेदीच्या घडणावळ मजुरीवर 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने या स्फटिकशुद्ध सुवर्णमहोत्सवी परंपरेविषयी…
ऐतिहासिक साताऱ्यातील मोती चौक ते शनिवार चौक (501 पाटी) दरम्यानचा रस्ता म्हणजे विविध सराफी दुकानांमुळे शहराचे ऐश्वर्य वाढविणारा “समृद्धीपथच’. याच सदाशिव पेठेत 2 डिसेंबर 1970 रोजी शा. वरदीचंद मेघराज बोहरा यांनी “श्री वर्धमान ज्वेलर्स’ या सराफी पेढीची मुहुर्तमेढ रोवली. सचोटी व प्रामाणिकपणाच्या बळावर सुरुवातीपासूनच या सराफी पेढीने चांगलीच लोकप्रियता मिळवली. व्यवसायाच्या बरोबरीनेच समाजकार्यातही ते सक्रिय असायचे. तोच वारसा त्यांचे सुपुत्र सुरेशशेठ बोहरा आणि नातू नितीन कै. बोहरा पुढे चालवत आहे.
व्यावसायिक भरारी घेतानाच सामाजिक बांधिलकी जपण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो. रक्तदान व आरोग्य शिबिरांच्या आयोजनातही त्यांचा सहभाग असतो. सर्वसाधारण मुलांच्या शाळांची अनेकजण स्थापना करतात. मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे ज्यांना मतिमंदत्वाचा शाप आहे, अशा विशेष मुलांसाठीच्या शाळेची संचालन करण्यात सुरेशभाईंना समाधान वाटते. याशिवाय भारतीय संस्कृतीत विशेष महत्व असलेल्या गोमातेच्या संवर्धन व पालनासाठी वेळे (ता. वाई) येथे स्थापन करण्यात आलेल्या करुणा मंदिर या गोशाळेच्या माध्यमातूनही ते संस्कृतीरक्षण आणि पशुदयेचा अध्याय जपतात.
भारत सरकार प्रमाणित हॉलमार्क दागिन्यांची साताऱ्यातील पहिले शोरुम हा मानही “श्री वर्धमान ज्वेलर्स’कडे जातो. चिन्हांकित सुवर्णालंकाराचे हे वातानुकूलित दालन सातारा शहरासह परिसरातील लहान मोठी गावे आणि संपूर्ण जिल्ह्यातील अनेक ग्राहकांचे विश्वासाचे केंद्र आहे. पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांची मोठी व्हरायटी, नाविन्यता “वर्धमान ज्वेलर्स व वर्धमान ज्वेलर्स “एनएक्स’मध्येच पहावयास मिळते. नवजात अर्भकाच्या दागिन्यांपासून लग्नबस्त्याच्या खरेदीपर्यंतची सर्व प्रकारच्या सुवर्णालंकाराची रेलचेल या पेढीत असते. म्हणूनच “डोळे झाकून सोने घ्यावे ते वर्धमानमध्येच’ आणि “वर्धमान एनएक्स’मध्ये अशी खाश्री शहराबरोबरच खेड्यापाड्यातील ग्राहकही व्यक्त करतात. यातूनच सुरेशभाई आणि नितीनभाई यांनी वाढवलेल्या या सराफी पेढीची विश्वासार्हता सिद्ध होते. लग्नबस्त्यासाठी वधू- वरांकरिता कमी वजनात जास्त दागिने आणि आकर्षक दागिन्यांचे सेट वर्धमान ज्वेलर्स आणि वर्धमान ज्वेलर्स एनएक्स’मध्येच मिळतात.
त्यामध्ये मंगळसूत्र, राणीहार, मिनी गंठण, अंगठ्या, टॉप्स इयर रिग्ज, झुमके, कर्णफुले, चोकर नेकलेसच्या असंख्य डिझाईन्स या पेढीत मिळतात. रिंगा, डोरली, पेन्डन्टस, इयरटॉप्स यांच्या तर शेकडो व्हरायटीज येथ उपलब्ध असतात. त्यामुळे मनमोहक अशा दागिन्यांच्या खरेदीमुळेच वधू- वरांप्रमाणे त्यांचे मातापिताही खूश होतात, असा अनेकांचा अनुभव आहे.
महाराष्ट्रीय संस्कृतीतील दागिन्यांप्रमाणेच टेम्पल, कारवारी, राजकोट, कोईमतूर आदी पॅटर्नच्या दागिन्यांसाठीही वर्धमान ज्वेलर्स आणि वर्धमान ज्वेलर्स एनएक्स नावाजलेले आहे. नवनवीन डिझाईन्स, सेलिब्रिटी पॅटर्न आणि ग्राहकांच्या मागणीप्रमाणे आकर्षक घडणावळीचे दागिने उपलब्ध करणे ही सुद्धा वर्धमानची खासियत. “ग्राहकांचे समाधान हीच आमची खुशी’ हे ब्रीदवाक्य तंतोतंत पाळणारे, सुरेशभाई बोहरा आणि नितीनभाई बोहरा खऱ्या अर्थाने आदर्श व्यापारी आहेत. विनम्र व तत्परसेवा, ग्राहकांना अचूक मार्गदर्शन व माहितीपूर्ण योग्य सल्ला देत दागिन्यांची विक्री ही वर्धमान ज्वेलर्सची आणखी एक खासियत.
दरम्यान, सुरेश बोहरा यांनी पारंपारिक सुवर्णकार व्यवसायाच्या बरोबरीने कन्स्ट्रक्शन व अन्य व्यवसायांमध्येही गती घेतली असून त्यांचा पुतण्या योगेश कै. बोहरा, त्यांनादेखील “अंश प्लाय’ या व्यवसायाच्या उभारणीत पाठबळ दिले व तो व्यवसायही यशस्वी करण्यात मोठे योगदान दिले आहे. सुरेशभाईंच्या मार्गदर्शनामुळे “अंश प्लाय’ची व्यवसायवृद्धीही स्पृहणीय अशीच झाली आहे. याशिवाय पुतण्या श्री. नितीन कै. बोहरा यांच्या माध्यमातून “वर्धमान एनएक्स’ हे सराफी शोरुमही सदाशिव पेठेत थाटले आहे. पिढीजात सराफी व्यवसायाच्या कौशल्याला आधुनिकतेची जोड देत श्री. नितीन आणि सुपुुत्र षविन यांनी सुरेशभाईंच्या सर्व अपेक्षा फलश्रुतीस आणण्यात चांगलेच यश मिळवले आहे.
आपल्या कुटुंबाबरोबरच समाजातील सर्वच हरहुन्नरी घटकांना मार्गदर्शन करण्यात सुरेशभाई धन्यता मानतात. व्यावसायिक आणि सामाजिक श्रेत्रात त्यांचा सल्ला खूपच मोलाचा ठरतो, असा अनेकांचा अनुभव आहे. निगर्वी, अभ्यासू आणि स्पष्टवक्ते सुरेशभाई खऱ्या अर्थाने अष्टपैलू व्यक्तीमत्व असून वर्धमान ज्वेलर्सच्या सुवर्ण महोत्सवानिमित्तच्या विविध उपक्रमातून त्यांचे व्यक्तीमत्वाचे विविध पैलू हिऱ्यांप्रमाणेच चमकतील, अशी तमाम सातारकरांची खात्री आहे.
साताऱ्यासह ठिकठिकाणी सोने चांदीच्या दागिन्यांची अनेक सराफी पेढ्या आहेत. मात्र “श्री वर्धमान ज्वेलर्स आणि वर्धमान ज्वेलर्स “एनएक्स’ने ग्राहकांच्या हृदयसिंहासनावर विराजमान होत मिळवलेली लोकप्रियता भल्याभल्या नामांकित पेढ्यांपेक्षा कितीतरी मोठी आहे. अनेकजण आपल्या व्यवसायाचे आणि स्वत:चे वाढदिवस साजरे करतात. मात्र, वर्धमानने यापूर्वी 25 व्या वर्धापनदिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत घेतलेले कार्यक्रम सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरले आहेत. 50 व्या वर्धापनदिन वर्षानिमित्त अर्थात सराफी पेढीच्या अर्धशतकी वाटचालीबद्दल ग्राहकाभिमुख विविध कार्यक्रम तसेच सामाजिक बांधिलकीचा वसा व वारसा जपत होणाऱ्या उपक्रमांबद्दल सर्वत्र मोठे औत्सुक्य आहे. हिऱ्यांचे दागिने अर्थात डायमंड ज्वेलरी आणि शुभरत्नांच्या दागिन्यांची मोठी नाविन्यता, व्हरायटी हे वर्धमानचे खास वैशिष्ट्य आहे.
सलग 50 दिवसांच्या वर्धमान महोत्सवात या पेढीतर्फे प्रत्येक ग्राहकाव्या दागिने खरेदीवर सोने व चांदीच्या दागिने घडणावळीच्या मजुरीवर 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. व्यावसायिक भरारीच्या बरोबरीने सामाजिक बांधिलकी जपणे आणि ग्राहकांप्रती कृतज्ञता म्हणून सवलत देणाऱ्या वर्धमान ज्वेलर्सची कीर्तीपताका “वर्धमान’ नावाप्रमाणे वृद्धिंगत होवो आणि अर्धशतकी दमदार प्रवासानंतर पुढील उज्वल प्रगतीसाठी सर्वांच्याच त्यांच्याप्रती सदिच्छा आहेत. मात्र, सराफी व्यवसायात स्वत:ची नाममुद्रा ठळकपणे उमटविणाऱ्या वर्धमान ज्वेलर्सच्या शोरुममध्ये सुवर्ण महोत्सवी वर्षात ग्राहकांची मोठी वर्दळ होईल. तसेच सर्वच ग्राहकांना आपल्या मनातील सुवर्णखरेदीची इच्छा पूर्ण करता येईल व मनासारख्या दागिन्यांच्या खरेदीचे स्वप्न साकार करता येईल. 50 व्या स्थापनावर्षात वर्धमानच्या विशेष योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकाने अवश्य या सुवर्णपेढीला भेट द्यायलाच हवी.