टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकून नीरज चोप्राने इतिहास रचला आहे. नीरजने टोक्यो ऑलिम्पिकच्या फायलनमध्ये ८७.५८ मीटर अंतरावर भाला फेकत भारताला एथलेटिक्समध्य़े पहिले गोल्ड मेडल मिळवून दिले आहे. मात्र फाईलनच्या आधी नीरज साठी सर्वकाही ठीक नव्हते. नीरजला आपला भाला मिळत नव्हता कारण त्याच्या भाला हा पाकिस्तानच्या अर्शद नदीमकडे होता. यासंदर्भात स्वत: नीरजने खुलासा केला आहे.
नीरजने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतील सांगितले की, ”मी अंतीम सामना सुरु होण्याआधी माझ्या भाल्याचा शोध घेत होतो. खूप शोधूनही भाला मिळत नव्हता मात्र अचानक माझे लक्ष अर्शद नदीमकडे गेले असता तो माझ्या भाल्या सोबत फिरत होता. त्यावेळी मी त्याला म्हणालो की, भाई हा माझा भाला आहे, तो मला देऊन टाक. मला याला थ्रो करायचे आहे.” तेव्हा अर्शदने नीरजला तो भाला वापस केला. तेव्हा आपण बघीतले असेलच मी माझा पहिला थ्रो घाईघाईत फेकला.
नीरज पुढे म्हणाला की, अर्शदने क्वॉलिफाइंग राउंडमध्ये चांगले प्रदर्शन केले. त्याने फाईनलमध्ये सुद्धा चांगली खेळी केली. मला वाटते की, हे पाकिस्तानसाठी चांगले आहे की, त्यांच्याकडे भालाफेकमध्ये रस दाखवण्याची चांगली संधी आहे. ते भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले प्रदर्शन करु शकतात.
यावेळी नीरजने पाकिस्तानच्या जनतेसाठी एक खास संदेश सुद्धा दिला आहे. तो म्हणाला की, अर्शद नदीमला पाठिंबा द्या. त्याने भालाफेकमध्ये पाकिस्तानला ओळख दिली आहे. त्याला तुमच्या सहकार्याची गरज आहे
नदीम टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानसाठी पदकाचा दावेदार होता. मात्र ८४.६२ ची त्याची सर्वोत्तम फेक पदकासाठी पुरेशी नव्हती. याआधी त्याने ८५.१६ मीटर थ्रोसह अंतिम फेरीसाठी पात्र झाला होता. तो ग्रुप बी मध्ये तीसऱ्या क्रमांकावर होता.