मुंबई: भाजप सोबत काडीमोड झाल्यानंतर आता राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं नवं सरकार सत्तेवर येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. असं असलं तरी काँग्रेसच्या काही नेत्यांचा विरोधाचा सूर कायम आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी या आघाडीला जोरदार विरोध केला आहे.
निरुपम यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या सरकारमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून सहभागी होणं म्हणजे काँग्रेसला गाडून टाकण्यासारखं आहे,’ असं त्यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.
वर्षों पहले उत्तर प्रदेश में #BSP के साथ गठबंधन करके काँग्रेस ने गलती की थी।
तब से ऐसी पिटी कि आज तक नहीं उठ पाई।
महाराष्ट्र में हम वही गलती कर रहे हैं।
शिवसेना की सरकार में तीसरे नंबर की पार्टी बनना कॉंग्रेस को यहां दफन करने जैसा है।
बेहतर होगा,काँग्रेस अध्यक्ष दबाव में न आएं।— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) November 21, 2019
‘काही वर्षांपूर्वी काँग्रेसनं बहुजन समाज पक्षासोबत आघाडी करून चूक केली होती. तेव्हा असा धुव्वा उडाला होता की अजून काँग्रेस त्यातून सावरली नाही. महाराष्ट्रात आम्ही पुन्हा तीच चूक करत आहोत. शिवसेनेच्या सरकारमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून सहभागी होणं म्हणजे स्वत:ला जमिनीत गाडून घेण्यासारखं आहे. काँग्रेस अध्यक्षांनी कुठल्याही दबावाखाली निर्णय घेऊ नये. त्यातच पक्षाचं भलं आहे,’ असं निरुपम यांनी म्हटलं आहे.