दिसपूर – देशात एकीकडे कोरोनाच्या मागील दोन लाटांमध्ये हाहाकार घातला. आता परिस्थिती दिलासा दायक असली तरी करोनाचे संकट संपलेले नाही. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सर्व यंत्रणा दिवसरात्र एक करून काम करत आहे. तर दुसरीकडे भाजपच्या मंत्र्यांकडून रोज जावई शोध लावण्यात येत आहेत.
यातच आसामचे मंत्री चंद्रमोहन पटवारी यांनी आता अजब वक्तव्य केल आहे. ते म्हणाले,’कोरोना आला त्यादिवशीपासून अजुनही तो कुठुन आला, चिनच्या प्रयोगशाळेत तयार केला गेला, पृथ्वीवर पाप खूप झालंय म्हणून देवाने तो पाठवला’
ते पुढे म्हणाले,’निसर्गाने ठरवलं आहे की कोणाला कोरोना होईल, कोणाला होणार नाही आणि कोणाला पृथ्वीपासून दूर नेलं जाईल. हे देवाच्या सुपर कॉम्प्युटरवरून घडत आहे, हा कोरोना मानवनिर्मित नाही. कॉम्प्युटरने 2 टक्के मृत्यूसह कोविड -19 विषाणू पृथ्वीवर पाठवण्याचा निर्णय घेतला’