रायपुर – छत्तीसगड सरकारने येत्या 20 जुलै पासून गोधन न्याय योंजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात गायीच शेण राज्य सरकारने दीड रूपया किलो दराने विकत घ्यायचे ठरवले आहे. खत प्रकल्पांसाठी हे शेण वापरले जाणार आहे.
मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी अलिकडेच या संबंधात घोषणा केली होती. या द्वारे खरेदी केल्या जाणाऱ्या शेणाचा उपयोग गांडुळ खत प्रकल्पासाठी केला जाईल. राज्यात 20 जुलै रोजी हरेली फेस्टीव्हल साजरा केला जात आहे त्याच दिवशी या योजनेचा प्रारंभ होणार आहे. हा हरेली फेस्टीव्हल कृषी हंगाम सुरू होण्याची नांदी म्हणून साजरा केला जातो.