मुंबई : का कायद्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा कोणाचे नागरिकत्व हिरवून घेत नसून नागरिकत्व देणारा कायदा असल्याचे म्हंटले आहे. ते आज मुंबईत भाजपच्या महाअधिवेशनात बोलत होते. तसेच विरोधक जाणून बुजून एनआरसी आणि सीएए कायद्याबाबत संभ्रम निर्माण करता आहेत आसा ठोला देखील त्यांनी लगावला.
मोदी सरकारमुळे काश्मीरमध्ये रक्ताचे पाट, नाही तर नवी पहाट उगवली असल्याचे फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर सरकारवर देखील टीका केली. महाआघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही. हे सत्तेसाठी एकत्र आलेलं सरकार असल्याचे ते म्हणाले. भाजपचा केवळ मिळवण्याचा उद्देश नसून समाजात बदल करण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.
राम मंदिरासाठी हजारो कारसेवकांनी बलिदान दिलं. जे लोक अयोध्येला जाण्याची भाषा करतात त्यांनी नक्की तिथं जावं त्यामुळे तुमचे खरे रक्त जागे होईल असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला हिंदुत्वाचा विचार देशाला दिला.