पणजी – भारतातील प्लॅस्टिक उद्योग हा अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. देशातील 60 टक्के प्लॅस्टिकचा पुनर्वापर होत आहे, जो विकसित देशांच्या तुलनेत जास्त आहे. सरकारच्या “मेक इन इंडिया’, “स्किल इंडिया’, “स्वच्छ भारत’ आणि “डिजिटल इंडिया’ उपक्रमांतून प्लॅस्टिक उत्पादन वाढत आहे, अशी माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिली.
All India Plastic Manufactureres Association along with MSME are oganising two day ‘GLOBAL MSME CONVENTION’ at Goa. A good initiative to find out alternatives and preserve environment.
— Narayan Rane (@MeNarayanRane) November 17, 2022
गोव्यातील जागतिक एमएसएमई अधिवेशनाच्या (GLOBAL MSME CONVENTION) उद्घाटन सत्रात नारायण राणे यांनी संबोधन केले. अंदाजे 50,000 उद्योग कार्यरत असून यापैकी बहुतेक उद्योग सूक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरूपाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. हे उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेत 3.5 लाख कोटींचे योगदान देतात. त्याचप्रमाणे 50,000 हून अधिक लोकांना रोजगाराच्या संधी देखील निर्माण करतात, अशी माहितीही त्यांनी दिली.
उद्योगमंत्री नारायण राणे म्हणाले, 2027 पर्यंत प्लॅस्टिक उद्योगाची वार्षिक उलाढाल 10 लाख कोटी आणि निर्यात दोन लाख टनांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. या उद्योगाच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांत एक कोटी लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
West Bengal : बंगालमध्ये लवकरच धनखड यांच्यासारखे राज्यपाल; भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा
प्लास्टिक उद्योगाला चालना देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा केंद्र सरकारचा संकल्प असून पंतप्रधानांच्या “आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी प्लॅस्टिक उद्योगाचे योगदान खूप मोठे असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.