वाघोली – सामाजिक उत्तरदायित्व लक्षात घेऊन समाजातील उपेक्षित व निराधार व्यक्तींना आधार देणे ही आपली संस्कृती असल्याचे प्रतिपादन वाघोलीच्या माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील यांनी केले.
माजी उपसरपंच राजेंद्र अमृतराव सातव पाटील मित्र परिवाराच्या वतीने वाघोली च्या माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील यांचा वाढदिवस पाचशे माहेर संस्थेतील अनाथ विद्यार्थी व नागरिकांच्या उपस्थितीत स्नेहभोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मोफत ७५० किलो धान्य वाटप कार्यक्रम देखील करण्यात आला . याप्रसंगी जयश्री सातव बोलत होत्या. माहेर संस्थेतील विद्यार्थ्यां समवेत वाढदिवस साजरा करून सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबविल्याबद्दल माहेर संस्थेच्यावतीने सातव पाटील परिवाराचे कौतुक करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील यांनी सांगितले की वाघोली मधील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून त्यांचे संघटन करून बचतीच्या माध्यमातून कुटुंबाला आधार देण्याची आणि त्यांचे मानसिक मनोबल वाढवण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. यातून महिला संघटित व बचत करून आत्मनिर्भर बनल्या आहेत. याच पद्धतीने समाजातील वंचित, उपेक्षित, निराधार व्यक्तींना देखील आधाराची गरज असून दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करून अशा व्यक्तींसाठी मदत करण्याची सवय अंगीकारावी असे सातव यांनी सांगितले. यावेळी माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी सांगितले की समाजातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींनी सामाजिक जाणीव लक्षात घेऊन समाजातील उपेक्षित घटकांसाठी सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम राबवून सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारावे. यापुढील काळात व यापूर्वीदेखील सातव कुटुंबीयांनी अनेक सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम राबवले आहेत यापुढील काळात देखील हे सुरूच राहतील असे माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी सांगितले.
वाघोली मधील प्रतिष्ठित कुटुंबाने वाढदिवस साधेपणाने साजरा केल्याबद्दल शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी सातव परिवाराचे कौतुक केले आहे.