मुंबई – विराट कोहलीच्या कसोटी कर्णधारपदाच्या राजीनाम्यानंतर विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी धक्कादायक विधान केले आहे. कोहलीच्या जागी कसोटीमध्ये संघाचे नेतृत्व करण्यासाठी ऋषभ पंत योग्य पर्याय आहे, असे मत गावसकर यांनी व्यक्त केले आहे. पंतने मला प्रभावित केले आहे.
त्याला कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्त केले जावे. आयपीएल स्पर्धेत त्याने दिल्ली कॅपिटल्सचे ज्या पद्धतीने नेतृत्व केले ते पाहता तो भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्वहयशस्वीरीत्या करेल, असा विश्वासही त्यांनी व्.क्त केला.
कोहलीच्या राजीनामा देण्याच्या निर्णयाचे अजिबात आश्चर्य वाटले नाही. खरेतर सामना संपल्यानंतर लगेचच तो हा निर्णय जाहीर करेल असे मला वाटत होते, पण तेव्हा त्याने हा निर्णय जाहीर केला असता, तर कुठल्यातरी रागातून हा निर्णय घेतला, असा संदेश गेला असता. त्यामुळे कोहलीने काही वेळानंतर हा निर्णय जाहीर केला त्याचे समाधान वाटले, असे गावसकर म्हणाले.
परदेशात मालिका गमावणे सहजतेने स्वीकारले जाते नाही. परदेशात मालिका गमावल्यानंतर कर्णधाराला पदावरून हटवण्याचा धोका असतो. आधी सुद्धा हे घडले आहे, आता सुद्धा असेच घडले असते. हाच अंदाज त्याने बांधला व म्हणून त्याने राजीनामा दिला, असेही गावसकर म्हणाले.