लाहोर – आयपीएल स्पर्धेत सुरुवातीच्या मोसमानंतर पाकिस्तानी खेळाडूंना खेळण्यास मनाई केली गेली. भारत व पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणाव आल्यावर बीसीसीआयला केंद्र सरकारने पाक खेळाडूंना स्पर्धेत खेळवण्यावर बंदी घातली.
मात्र, आता इतक्या वर्षांनंतर पाकिस्तानचा माजी वोगवान गोलंदाज शोएब अख्तर याने बीसीसीआयकडे विनंती केली आहे. त्यांचा आयपीएलमधील संघांमध्ये समावेश झाला तर ही स्पर्धा जास्त रोमांचक होईल, असेही तो म्हणाला.