शिरूर – गेल्या अनेक दिवसांपासून शिरूर शहर व पंचक्रोशीला पाण्यासाठी तीव्र झळा सोसाव्या लागल्या होत्या. परंतु गेल्या महिनाभर सुरू असलेल्या पावसामुळे शिरूर येथील घोडनदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांना आता पाणीटंचाईपासून मुक्ती मिळाली आहे.
शिरूर शहरात गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून दिवसा तर कधी दोन दिवसाआड नळाला पाणी येत होते. यामुळे मोठ्या प्रमाणात महिला, नागरिकांचे हाल होत होते. मुबलक पाऊस धरण क्षेत्रामध्ये पडत आहे. शिरूर पंचक्रोशीत पावसाने साथ दिल्याने बोअरवेलची पाण्याची पातळी वाढली आहे. विहिरींची पाण्याची पातळी वाढली आहे.