पेठ: ता. आंबेगाव येथील वाकेश्वर विद्यालयातील 1981 च्या 10 वी बॅचच्या माजी विद्यार्थी 29 वर्षांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या शिक्षकां सोबत गेट टूगेदर साजरे केले.अशी माहिती बॅच चे सदस्य व आयोजक बाळासाहेब पवळे यांनी दिली.
हल्लीचं जगणं कसं स्ट्रेसफुल, स्पिडफुल झाले आहे.
यामध्ये तुम्हाला निडफुल काय आहे? याचा विचार कमीच होतो. धावताधावता थकून जाताना मग कोठेतरी विरंगुळा शोधला जातो. चार मित्रांच्या संगतीने कोठेतरी फेरफटका होतो किंवा गेट टुगेदरची आयडीया कोणीतरी सुचवतो मित्रमैत्रिणींच्या गेट टुगेदर बरोबरच आता रिलेटिव्ह गेट टुगेदर करूनही वंशावळींची नाळ जपण्याचा एक सुरेख संगम हल्ली अनेक ठिकाणी साधला जात आहे.
जत्रा, यात्रा, सण, उत्सवाद्वारे एकत्रिकरण व्हावे, विचारांची देवाणघेवाण व्हावी, एनर्जी निर्माण व्हावी म्हणूनच या उत्सवांचे नियोजन अगदी पूर्वीपासून केले गेले आहे. यातून समाजाचे एकत्रिकरण होतेच पण याहीपेक्षा कोणताही सण, उत्सव नसताना केवळ एकमेकांना भेटण्यासाठी हल्ली ‘गेट टुगेदर’ अॅरेंज केली जातात असेच गेट टुगेदर वाकेश्वर विद्यालय पेठ येथील इयत्ता दहावीच्या 1981 च्या बॅच ला अध्यापन करणारे शिक्षक शहाजी गावडे,ज्ञानेश्वर अरगडे,विलास महाजन,कुलकर्णी, रसाळ उपस्थित होते.
,बाळासाहेब पवळे,महादेव काळे,विलास काळे,आशा धुमाळ बोत्रे,रमेश बोरकर,रामदास काळे आदी पुणे मुंबई येथील माजी विद्यार्थी उपस्थित होते.
यातील अनेक विद्यार्थी महानगरपालिका, औद्योगिक क्षेत्र,वनखाते,शैक्षणिक, शेती शिक्षण अश्या विविध ठिकाणी काम करतात.
त्यावेळचे हे विद्यार्थी आता एकत्र आल्यानंतर एकमेकांच्या अडचणी, सुखदुःखे,विविध विषयांवर चर्चा करतात आणि अनाथ वुद्धासाठी सामाजिक जाणीव म्हणून फंड गोळा करतात. चर्चा सत्र संपल्यानंतर अंताक्षरी चा कार्यक्रम पार पाडला.मुंबई, पुणे, संगमनेर अशा विविध भागातून हे विद्यार्थी आले होते.