रायपूर – विराट कोहली काय किंवा मी काय, गेल्या काही काळात अपयशी ठरलो तेव्हा लगेचच माध्यमांनी आमच्यावर टीका सुरु केली. इतकेच नव्हे तर आम्हाला संघातूनही बाहेर काढा अशी मागणीही होत होती. मात्र, आम्ही खरेच अडीच तीन वर्षे अपयशी ठरलो का. या कालावधीत भारतीय संघाने सरस कामगिरी केलीच नाही का, याचा जरा विचार करा, त्यांची माहिती घ्या व जे काही विचाराल ते अभ्यास करुनच विचारा, असे खडेबोल भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने माध्यमांच्या प्रतिनिधिंना सुनावले आहेत.
Suryakumar Yadav | सूर्याने रचला इतिहास! ‘हा’ पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला
न्युूझीलंडविरुद्धच्या विजयानंचर बोलतान रोहितने सगळ्याच पत्रकारांची भंबेरी उडवली. तो म्हणाला, मी तीन वर्षांत फक्त 12 एकदिवसीय सामने खेळले आहेत, तीन वर्षे खूप काही सांगण्यासारखे वाटत असले तरीही त्या कालावधीत खेळाडूने कीती सामने खेळले आहेत याचा अभ्यासही केला पाहीजे. गेल्या वर्षी आम्ही एकदिवसीय क्रिकेट फारसे खेळलो नाही. टी-20 क्रिकेटवर जास्त लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे प्रसारकांनी योग्य गोष्टी दाखवल्या पाहिजेत.
ICC ODI Ranking | मोहम्मद सिराजची दिग्गजांवर मात; बनला जगातील अव्वल गोलंदाज
मी तीन वर्षांत काय केले. कोहलीनेही या कालावाधीत काय केले असे प्रश्न जेव्हा विचारले जातात तेव्हा त्यामागे आकडेवारी हवी की आम्ही या कालावाधित नक्की कीती सामने खेळलो व कीती मालिकांमधून विश्रांतीही घेतली. शानदार पुनरागमन वगैरे उपमा माध्यमेच देतात. आमच्यासाठी यशाच्या मार्गावर येण्यासाठी तो एक लाभदायक दृष्टीकोन असतो. त्यामुळे मते मांडण्यापूर्वी वस्तूस्थिती पडताळून पाहा, असेही रोहित म्हणाला.