नवी दिल्ली : कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. देशात संपूर्ण लॉकडाऊन असताना देखील रुग्ण संख्या कमी होताना दिसत नाहीय. शनिवारी देशभर कोरोना विष्णुमेळे ७१ कोरोनाबाधित रुग्णांचा बाली गेला आहे. तर आतापर्यंत १ हजार २२३ जणांचा या घातक विषाणूने बळी गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनाबाधितांचा आकडा ३७ हजार ७७६ वर पोहचला आहे.
तर संपूर्ण देशभरात २६ हजार ५३५ जणांचा रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, देशभरात १० हजार १७ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. विदेशातील १११ कोरोनाबाधित नागरिक देशात आहेत.