नवी दिल्ली – भाजपकडून पूर्व दिल्लीतून उमेदवारी देण्यात आलेला माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याच्यावर आपच्या नेत्या आणि उमेदवार आतिशी मार्लेना यांनी गंभीर आरोप केले. आतिशी यांनी गंभीरच्या समर्थकांनी पत्रक वाटप केल्याचा आरोप केला आहे. या पत्रक वाटप प्रकरणाने आता आता अधिक ‘गंभीर’ वळण घेतलं आहे.
आतिशी यांनी समर्थकांनी वाटलेल्या या पत्रकांमध्ये, त्यांच्या जातीबाबत, आई वडिलांबाबत, माझ्याबाबत अपशब्द वापरण्यात आले आहेत, असे सांगत असताना आतिशी यांना पत्रकार परिषदेत रडूही कोसळले. दरम्यान त्यांनी जी पत्रकं माझ्याविरोधात वाटली जात आहेत ती वाचणंही लज्जास्पद आहे असंही आतिशी यांनी म्हटलं आहे.
यावर गौतम गंभीर यांनी ट्विटरवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टॅग करत लिहीलंय की “जर त्यांच्याकडे पुरावा असेल, तर मी तत्काळ राजकारणातून निवृत्त होईल. त्यांनी 23 मेपर्यंत पुरावा दिला, तरी मी राजकारण सोडून देईन. पण जर अरविंद केजरीवाल यांनी पुरावे दिले नाहीत, तर 23 मेनंतर ते राजकारण सोडतील का?’ असा सवाल गंभीरने विचारला आहे.
My Challenge no.2 @ArvindKejriwal @AtishiAAP
I declare that if its proven that I did it, I will withdraw my candidature right now. If not, will u quit politics?— Gautam Gambhir (Modi Ka Parivar) (@GautamGambhir) May 9, 2019