चार दिवसांच्या कसोटीबाबत शोएब अख्तरचे मत
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कसोटी क्रिकेटचे सामने पाचऐवजी चार दिवसांचे करण्याचा घाट घातला आहे. मात्र याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मत महत्त्वाचे ठरणार असून मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुलीचे मत निर्णायक ठरेल, असे विधान पाकिस्तानचा माजी कसोटीपटू वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने केले आहे.
गेली 142 वर्षे कसोटी सामना पाच दिवसांचा खेळविण्यात आलेला आहे. त्यापूर्वी तर तीन दिवसांनंतर विश्रांतीचा दिवस होता. प्रत्येक मोसमातील व्यस्त वेळापत्रक लक्षात घेता कसोटी सामन्यांचे स्वरूप बदलून ते 4 दिवसांचे करण्याचा विचार आयसीसी करत आहे. भारतीय मंडळाच्या अध्यक्षपदी
गांगुली आहे.
गांगुली हा अत्यंत हुशार आणि प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्व आहे. भारतीय मंडळाच्या होकाराशिवाय आयसीसी हा प्रस्ताव अंमलात आणू शकत नाही. आणि कसोटी क्रिकेट अशा पद्धतीने वाईट अवस्थेत जाताना गांगुलीलाही आवडणार नाही.
कसोटी क्रिकेटला गांगुली धक्का लागू देणार नाही, असा विश्वास अख्तरने व्यक्त केला. कसोटी सामना चार दिवसांचा करण्याच्या नियमाची अंमलबजावणी 2023 पासून होण्याची शक्यता आहे. विरोधानंतरही आयसीसी बैठक घेणार.