नवी दिल्ली –करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या पहिल्या गगनयान मोहीमेलाही विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही मानव रहित अंतरीक्ष मोहीम डिसेंबर 2020 मध्ये हाती घेतली जाणार होती. भारत डिसेंबर 2022 मध्ये मानवासहित अंतरीक्षात यान पाठवणार आहे. त्या आधी मानवरहित दोन याने अंतरीक्षात पाठवली जाणार आहेत. त्यातील पहिले चाचणी यान डिसेंबर 2020 मध्ये अंतरीक्षात पाठवले जाणार होते.
इस्त्रोच्या अंतरीक्ष आयोगातर्फे या मोहीमेच्या तयारीचा आढावा घेतला जात आहे. त्यानंतर या विषयीचा अंतिम निर्णय जाहींर केला जाणार आहे. इस्त्रोचे अध्यक्ष के सिवान हेच या आयोगाचे अध्यक्ष आहेत. भारताच्या स्वातंत्र्याला सन 2022 मध्ये 75 वर्ष पुर्ण होत आहेत. त्यानिमीत्त भारतातर्फे तीन अंतरीक्षांना अंतराळात पाठवले जाणार आहे.
ही भारताची स्वदेशी तंत्राने होणारी पहिलीच मानवासहित अंतराळ मोहीम असणार आहे. त्यासाठीची तयारी इस्त्रोने सुरू केली आहे. तथापि मुख्य मोहीमेच्या आधी डिसेंबर 2020 आणि जून 2021 मध्ये मानवरहित याने अंतराळात पाठवली जाणार आहेत. त्यातील यंदाच्या डिसेंबर मधील मोहीम पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. करोनामुळे इस्त्रोच्या ज्या मोहीमांवर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यात चांद्रयान तीनचाही समावेश आहे.