नवी दिल्ली -महाराष्ट्रच्या राजकीय घडामोडीवर आता देशाचे रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. ‘लोकांना एक-दोन वेळा मूर्ख बनवले जाऊ शकते, परंतु ते वारंवार शक्य नाही.’ असं म्हणत त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
दरम्यान,भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (आयसीएआर) अंतर्गत अमरावती रोड येथील केंदीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या (सीआयसीआर) वतीनं ‘सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे रोगमुक्त लिंबूवर्गीय वनस्पतीचे उत्पादन या विषयावर आधारित दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं. यावेळी माध्यमांशी बोलतांना राजकीय घडामोडीवर त्यांनी आपल मत मांडलं आहे.
ते म्हणाले,’ हे युग गुणवत्तेचे आहे. राजकारण असो किंवा व्यापार-व्यवसाय, त्याला पर्याय नाही. जे लोक ‘शॉर्ट कट’चा अवलंब करतात. त्यांना भविष्य नाही.लोकांना एक-दोन वेळा मूर्ख बनवले जाऊ शकते, परंतु ते वारंवार शक्य नाही. जेव्हा लोकांना आपली फसवणूक झाल्याची जाणीव होते, तेव्हा ते अशांना दारात उभेदेखील करीत नाही.’ असं म्हणत महाराष्ट्रातील राजकीय नाट्यावर गडकरी यांनी अप्रत्यक्षरित्या टिप्पणी केली.
दरम्यान, ,’मी महाराष्ट्रातील राजकारणावर अधिक भाष्य करणार नाही. मात्र, मी एवढे नक्की सांगेन, की जर शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र आले, तर माझ्यासारख्या व्यक्तीला नक्कीच आनंद होईल.’ असं ही नितीन गडकरी म्हणाले होते.