औरंगाबाद – देशात जो माल आयात केला जातो तोच माल देशांतर्गत उद्योगांमध्ये उत्पादीत केला जाणे गरजेचे आहे. त्यासाठी उद्योगसंस्थांना अधिक संशोधन करून या मालाला पर्यायी देशी माल पुरवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
काही मशिन्सचे सुटे भाग आपण मोठ्या प्रमाणात आयात करतो, हे सुटे भाग भारतातच तयार केले जाऊ शकत नाहींत काय याचे उत्तर आता शोधायला हवे असे त्यांनी म्हटले आहे. आत्मनिर्भर इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाचे आज गडकरींच्या हस्ते उदघाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.
भारतात सुटे भाग तयार करणाऱ्या उद्योगांना आपल्या कंपन्यांनीही सहर्काय केले पाहिजे असे आवाहन गडकरी यांनी केले.आत्मनिर्भर इनोव्हेशन चॅलेंज ही स्पर्धा देशातील नव्या संकल्पनेतील स्टार्टअपला चालना देण्यासाठी आयोजित केली जाते. त्यात 17 राज्यांतून 210 प्रवेशिका आल्या आहेत.