मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील 150 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 67 टक्के मतदान झाले, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.
आयुक्त मदान यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे 360 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा 16 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अंशत: बिनविरोध झाल्या.
त्यामुळे प्रत्यक्षात 170 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी; तर 150 ग्रामपंचायतींसाठी बुधवारी (ता. 20) मतदान झाले. सकाळी 7.30 पासून ते दुपारी 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ होती. या सर्व ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी 22 जानेवारी 2021 रोजी पार पडणार आहे.