लंडन – विश्वचषक हा क्रिकेटचा आहे की पावसाचा असा प्रश्न येथील चाहत्यांना पडला आहे. आतापर्यंत चार सामने पावसाने धुतले असल्यामुळे चाहत्यांमध्ये कमालीची नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. विश्वचषक स्पर्धेचे संयोजन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर चाहत्यांनी समाज माध्यमाद्वारे चांगलेच तोंडसुख घेतले आहे.
विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांमध्ये भारतीय उपखंडातील लोकांची संख्या खूप आहे. त्यातही भारतीयांचा अधिकाधिक भरणा असतो. यंदा या स्पर्धेसाठी भारतामधून सव्वा लाखापेक्षा अधिक लोकांनी या स्पर्धेसाठी व्हिसा घेतला आहे. त्याखेरीज अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोपातील अन्य देशात स्थायिक किंवा नोकरी करणाऱ्या भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेची तिकीटे घेतली आहेत.
लाखो रूपये खर्च करून पाऊस पाहावयास मिळत असेल तर काय उपयोग अशीच भावना समाज माध्यमांवर दिसून येत आहे. ही स्पर्धा भारतात आयोजित केली असती तर चांगल्या पध्दतीने झाली असती असेही मत अनेक चाहत्यांनी व्यक्त केले आहे. न्यूझीलंडविरूध्दचा सामना रद्द झाल्यानंतर भारतीय संघाचे साहाय्यक प्रशिक्षक आर.श्रीधर यांनी हे क्रिकेट मैदान आहे की स्केटिंग रिंग अशी प्रतिक्रिया दिली होती.
पावसाच्याच संघांचे सामने
या स्पर्धेतील उपांत्य फेरीत हलक्या सरीविरूध्द मुसळधार सरी आणि गारांचा पाऊसविरूध्द वादळी वाऱ्यांसह पाऊस असे सामने होतील. सरतेशेवटी पाऊसच विजेता होईल अशी उपहासात्मक टीका करण्यात आली आहे.
Cricket rain World Cup#ICCWorldCup2019 pic.twitter.com/ObdEXTgBlO
— Himanshu maurya (@Himu563) June 14, 2019
फेसबुकवर या विषयाबाबत मोठ्या प्रमाणावर व्यंगचित्रेही सुरू झाली आहेत.
2019 world cup winner is rain #ICCWorldCup2019 pic.twitter.com/pYovRd15nl
— Soyal Mishra (@MishraSoyal) June 11, 2019
अंतिम सामना लॉर्डस मैदानावर पाण्याखाली (अंडर वॉटर ) खेळला जाईल अशा आशयाचे छायाचित्रही समाज माध्यमावर प्रसारित झाले असून त्यास चाहत्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
Rain will win the world cup 2019#worldcup19#ICCWorldCup2019 #INDvsNZ #BCCI pic.twitter.com/mO8ZWKZF39
— Nitesh Kumar (@iamNitesh13) June 13, 2019