पुणे – मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग रविवारपासून सुरू होणार आहे. दररोज 400 वाहनांना बाजारात प्रवेश दिला जाणार असून, एका आडत्याला एका वाहनातून माल बाजारात आणता येणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग दि.10 एप्रिलपासून बंद होता.
तर, काही व्यापाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याने 19 मेपासून गुळ-भुसार विभाग बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर दि.25पासून गुळ-भुसार बाजार सुरू झाला आहे.