पुणे – पावसामुळे फळांच्या दर्जावर परिणाम झाला आहे. परिणामी, मार्केट यार्ड फळबाजारात बहुतांश फळांची आवक घटली आहे. त्यामुळे कलिंगड, खरबूज, पपई, डाळींब या फळांच्या भावात वाढ झाली आहे.
कलिंगड, खरबूज, पपईच्या भावात किलोमागे 5 रुपयांनी, तर डाळिंबाच्या भावात 10 टक्क्यांनी वाढ झाली. आवक वाढल्याने संत्र्याच्या भावात 10 टक्क्यांनी घट झाली. इतर सर्व फळांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
मार्केट यार्ड फळबाजारात रविवारी केरळ येथून अननस 3 ट्रक, मोसंबी 70 ते 80 टन, संत्री 7 ते 8 टन, डाळिंब 125 ते 150 टन, पपई 20 ते 25 टेम्पो, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, पेरू 600 ते 700 क्रेटस्, चिकू 600 ते 700 क्रेटस्, कलिंगड 10 ते 12 टेम्पो, सिताफळ 6 टन, खरबुजाची 3 ते 4 टेम्पो इतकी आवक झाली.
फळांचे भाव
लिंबे (प्रति गोणी) : 200-300, अननस (डझन) : 70-270, मोसंबी : (3 डझन) : 100-230, (4 डझन) : 25-120, संत्रा : (3 डझन) : 100-200, ( डझन ) : 30-100, डाळींब (प्रति किलोस) : भगवा : 40-100, गणेश : 10-50, आरक्ता 25-60. कलिंगड : 10-20, खरबुज : 10-30, पपई : 5-20, चिकू : 100-600, पेरू : 250-500, सिताफळ 10-140.