कोल्हापूर – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विराट मोर्चा 7 नोव्हेंबरला पुणे साखर आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे. मागील वर्षाची एफआरपी आणि ज्यादा 200 रुपये रक्कम देण्याची मागणी केलीय. दरम्यान 7 नोव्हेंबर पूर्वी ही रक्कम द्या अन्यथा पुण्यात आल्यावर काय होईल सांगता येणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टींनी दिलाय. ते कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर इथल्या विक्रमसिंह मैदनावर 21 व्या ऊस परिषदेत बोलत होते.
दरम्यान, वजन काटेही ऑनलाइन करण्याची मागणी करत शेतकरी अंगावर आले तर सरकारचं अवघड होईल असंही शेट्टी यांनी म्हटलं आहे. तसचं राजू शेट्टींनी कारखानदारांना 17 नोव्हेंबर पर्यंतचाचा अल्टिमेटम दिलाय. 17 नोव्हेंबर पूर्वी कारखान्यांनी पैसे नाही दिले तर उसाच्या तोडी बंद पाडत बेमुदत राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याच्या घोषणा शेट्टी यांनी केलीय..
चालू गळीत हंगामात एकरकमी एफआरपीसह अधिकचे 350 रुपये प्रतिटन पहिली उचल द्यावी, गतवर्षीच्या ऊसाची एफआरपी अधिक 200 रुपये तातडीने जमा करा, कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाइन करा यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत 13 ठराव मंजूर करण्यात आले. जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावर दरवर्षी प्रमाणे यांदाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानीची 21 वी ऊस परिषद पार पडली. यावेळी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होती. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. परंतु, स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर ऊस परिषदेस गैरहजर होते.