नागपूर: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा यासाठी साखर कारखान्यांकडून एफआरपीच्या रक्कमेत थकबाकी ठेवण्यात येते, अशी चर्चा असली तरी देखील २०१८-२०१९ या काळात १५५७.५९ कोटी रक्कम थकीत आहे. शिवाय यातील १३०५.४४ कोटी म्हणजेच ८४ टक्के रक्कम वसूल करण्यात आली आहे व उर्वरित २३३.९७ कोटी थकित रक्कम वसूल करण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी स्तरावर सुरू असल्याची माहिती कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी विधान परिषदेत दिली.
तसेच शेतकऱ्याला त्याचे पैसे देण्याचे काम नक्कीच होईल. यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. या प्रक्रियेशी सर्व साखर कारखान्यांना कटिबद्ध राहावे लागेल. शिवाय विशेष समितीमार्फत गुजरात मधील दराचा विचार करुन आपल्या राज्यात असलेली तफावत जाणून ती दूर करण्याचा प्रयत्न होईल व शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल, अशी ग्वाही मंत्री जयंत पाटील यांनी दिली.