मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनआरसी महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही, अशी भूमिका मांडली आहे. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर वादग्रस्त टीका केली आहे. या टीकेचा समाचार राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतला आहे.
सीएए कायदा केंद्राचा आहे. कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का? अशी टीका आशिष शेलार यांनी केली होती. यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले कि, उद्धवच्या बापाचे राज्य आहे का? असं जाहीर निवेदन करणं आशिष शेलार यांना शोभत नाही. आणि होय मराठी मातीला आई आणि मराठी माणसाला बाप मानण्याची आमची संस्कृती आहे. आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.
उद्धव च्या बापाचे राज्य आहे का … असे जाहीर निवेदन करणे @ShelarAshish ह्यांना शोभत नाही ..
आणि होय
मराठी माती ला आई आणि मराठी माणसाला बाप मानण्याची आमची संस्कृती आहे …
आम्ही गुजरात मध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही ….— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 3, 2020
जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला आशिष शेलार यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले कि, संसदेत पारित कायदा मान्य करणे. देशाचे संविधान मान्य करणे ही महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्राची संस्कृती आणि ख्याती आहे. संसदेचे कायदे आणि संविधान मान्य नाही का? याचे उत्तर राष्ट्रवादीने द्यावे, जितेंद्र आव्हाड प्रश्न तुम्हाला आहे, असा सवाल शेलार यांनी विचारला आहे. मा. उध्दवजींकडे रोख नाही, असे स्पष्टीकरणही आशिष शेलारांनी दिले.
संसदेत पारित कायदा मान्य करणे..देशाचे संविधान मान्य करणे ही महामानव,भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्राची संस्कृती आणि ख्याती आहे.संसदेचे कायदे आणि संविधान मान्य नाही का? याचे उत्तर राष्ट्रवादीने द्यावे,@Awhadspeaks प्रश्न तुम्हाला आहे. मा. उध्दवजींकडे रोख नाही.
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 3, 2020