नवी दिल्ली – भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या कक्षेत देशातील 36 राज्य संघटना आहेत. या संघटनांमधील खेळाडूंकडून ऑलिम्पिक पदकांची अपेक्षा आहे. त्यामुळे आतापासून पुढील दोन ऑलिम्पिक स्पर्धांचा विचार केला पाहिजे, असे मत केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी व्यक्त केले आहे.
2004 सालापासून भारतीय खेळाडूंनी सातत्याने ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदके जिंकलेली आहेत. देशातील 36 संघटनांनी आपल्या खेळाडूंचे निरीक्षण करून राज्यात कोणत्या खेळाला जास्त वाव आहे हे पाहून त्या खेळाकडे जास्त गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. देशात क्रीडा संस्कृती रुजली तरच सातत्याने अव्वल खेळाडू तयार होतील, असेही रिजीजू म्हणाले.