मुंबई – न्यायालयाने अटक वॉरंट काढण्याचा इशारा दिल्यानंतर अभिनेत्री कंगना राणावत न्यायालयात हजर झाली. त्यानंतर तिने तिच्यावर अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करणाऱ्या जावेद अख्त यांच्यावर खंडणी आणि गुन्हेगारी हेतूची तक्रार केली. या न्यायालयावर विश्वास राहिला नसल्याने दुसऱ्या न्यायलयात खटला वर्ग करण्याची मागणी केली. तत्पुर्वी मुंबई उच्च न्यायालयाने तिच्यावर दाखल केलेला हा गुन्हा रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली.
कंगना राणावत अंधेरीचे महानगर न्यायदंडाधिकारी आर. आर. खान यांच्या न्यायालयात हजर झाली. अख्तर यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी न्या. खान यांनी सुरू केली. त्यावेळी तिने हा खटला दुसऱ्या न्यायलयात वर्ग करण्याचा विनंती अर्ज दाखल केला. त्याचवेळी अख्तर खंडणी मागत असल्याचा आरोपही तिने केला.
अंधेरी न्यायलयात सुरू असणाऱ्या सुनावणी दरम्यान आपल्या सुखकर वाटत नाही, असे ती म्हणाली. हे न्यायालय पक्षपाती आहे, असे त्यांना वाटत असल्याचे कंगना यांच्या वकीलाने न्यायलयात सांगितले. या दोन्ही याचिकांवरील पुढील सुनावणी मख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात एक ऑक्टोबर रोजी होणार आहे.
कंगनाचे वकील झिवान सिद्दीकी म्हणाले की, मी महत्वाचे विधान करत आहे. जामीनपात्र आणि अदखलपात्र गुन्ह्यात अटक वॉरंट काढण्याचा इशारा देत असल्याने या न्यायलयावर माझा विश्वस राहिला नाही. त्यज्या प्रकरणात आपल्या आशीलाला बोलावलेच नाही त्या प्रकरणात त्यांच्यावर असमन्स काढले जाते.
या मुद्द्यांवरच कंगनाने जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणख दुसऱ्या न्यायालयात वर्ग करण्याची याचिका दाखल केली. सिद्दीकी यांनी सांगितले की, अख्तर यांच्यावर कंगना यांनी खंडणी आणि गुन्हेगारी हेतूची भारतीय दंडसंहितेच्या कलम 383, 387, 503 आणि 506 नुसार फिर्एोद दाखल केली आहे.
या खटल्याची सुनावणी स्थगित करण्यास अख्तर यांचे बकील ऍड. जय भारद्वाज आणि प्रिया अरोरा यांनी विरोध केला. मात्र न्यायालयाने तक्रार आणि या अर्जाला उत्तर देण्यासाठी ही सुनावणी 15 नोव्हेंबरपर्यंत स्थगित केली.