आळंदी – येथील 45 ते 60 वयोगटातील सहव्याधी (मधुमेह, रक्तदाब इत्यादी) असलेल्या तसेच ज्यांनी अद्याप करोना लसीचा पहिला डोस घेतलेला नाही.
त्यांनी बुधवार (दि. 24) व गुरुवार (दि. 25) सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालय आळंदी येथे लस घेण्यासाठी यावे, असे आवाहन डॉ.जी. जी. जाधव यांनी केले आहे.
दरम्यान, लस घेतली तरी आपल्याला करोना होणार नाही, या गैरसमजात कोणी राहू नये. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.