मुंबई – कोविड१९ मुळे परराज्यातील नागरिकांना ज्याप्रमाणे आपण स्वगृही पाठवत आहोत त्याचप्रमाणे राज्यांतर्गत अडकलेल्या विविध भागातील नागरिक, विद्यार्थी यांना मोफत स्वगृही पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी रा.मा. परिवहन महामंडळाने पोर्टल तयार केले असून ते सोमवारपासून कार्यान्वित होईल, याबदल परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अत्यंत मोठा निर्णय जाहीर केला.
राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकून पडलेल्यांना आपल्या मूळगावी जाण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यांना गावाला जायचे आहे, त्यांना सोमवारपासून एसटीतून त्यांच्या गावाला मोफत जाता येणार आहे. एका बसमधून केवळ २२ लोकांनाच त्यांच्या गावाला सोडण्यात येणार आहे. येत्या १७ मेपर्यंतच ही सुविधा राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1209487756057594/
यासाठी या लोकांनी २२ जणांची एक यादी करावी. शहरातील लोकांनी ही यादी पोलीस ठाण्यात द्यावी, तर गावातील लोकांनी ही यादी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांकडे सोपवावी. त्यात त्यांचा मोबाइल नंबर, आधारकार्ड, राज्यात कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी जायचं आहे, याची माहिती नोंदवायची आहे. २२ जणांचा ग्रुप झाल्यानंतर पोलीस किंवा जिल्हाधिकारी त्यांना बस सुटण्याचे ठिकाण सांगतील, त्यानंतर डेपोत येऊन बसमधून गावाला जायचे आहे, असं अनिल परब यांनी यावेळी सांगितलं.