पुणे (प्रतिनिधी) – भिशी स्कीम करुन जास्तीचा नफा मिळेल असे अमिष महिलांना दाखवून एका दांम्पत्याने १० ते १२ महिलांची एकूण ६० लाख रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सुजाता चेन्नकेशवल्लु रामगिरी व चेन्नकेशवल्लु चेन्नय्या रामगिरी (रा.घाेरपडी,पुणे) या आराेपींविराेधात मुंढवा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रत्ना व्यंकटेशराव अप्पाने (वय-३८) यांनी पाेलीसांकडे फिर्याद दिली आहे. मार्च २०१८ पासून आराेपी दांम्पत्याने भिशी स्कीम सुरु करुन त्यात गुंतवणुक केल्यास जास्तीचा नफा मिळेल असे अमिष दाखवून भिशीत पैसे गुंतवणुक करण्यास महिलांना भाग पाडले.
महिलांना राेख रक्कमेचे अमिष दाखवून लिलाव भिशीत बाेली लावण्यास लावुन सगळया सदस्यांना चांगला परतावा दिल्याचे भासवून मार्च २०१८ पासून प्रत्येक महिलान अडीच लाख रुपये याप्रमाणे एकूण ६० लाख रुपये गुंतवणुक करुन घेण्यात आले.
गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतर परतावा मागणेकरिता ऑक्टोबर २०२० मध्ये तक्रारदार आराेपींकडे गेल्या असता त्यांनी गुंतवणुकीचा परतावा तसेच ठेवीचे पैसे परत करण्यास नकार देत तक्रारदार यांच्यासह १० ते १२ महिलांची फसवणुक केली आहे. याबाबत मुंढवा पाेलीस पुढील तपास करत आहे.